Current Affairs | चालू घडामोडी | 15 AUG 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 15 AUG 2024

1) 15 ऑगस्ट दिनविशेष

1.1) 15 ऑगस्ट 1947 = भारताचा 78 वा स्वातंत्र्य दिन

1.2) 15 ऑगस्ट 1969 = इस्रो ची स्थापना

  • मुख्यालय = बेंगळुरू

2) दरवर्षी 15 ऑगस्ट हा स्वातंत्र्यदिन म्हणून साजरा केला जातो.

  • 15 ऑगस्ट 1947 रोजी देश स्वतंत्र झाला. लाल किल्ल्यावर पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा ध्वज फडकावून प्रथम स्वातंत्र्यदिन साजरा केला.
  • तेव्हापासून दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो.
  • स्वातंत्र्य दिन 2024 ची अधिकृत थीम : ‘विकसित भारत’
  • ही थीम 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्रात बदलण्याच्या सरकारच्या संकल्पनेचे प्रतीक आहे.

3) व्ही. शांताराम पुरस्कार : शिवाजी साटम

  • CID मालिकेतून घराघरात पोहोचलेले अभिनेते शिवाजी साटम यांना यंदाचा व्ही शांताराम पुरस्कार जाहीर झाला आहे.
  • प्रसिद्ध लेखक दिग्पाल लांजेकर यांना व्ही शांताराम विशेष योगदान पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
  • महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने देण्याते येणारे पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत.
  • ज्येष्ठ अभिनेत्री आशा पारेख यांना स्व. राज कपूर जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
  • व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार : प्रसिद्ध लेखक दिग्पाल लांजेकर

4) लेफ्टनंट जनरल विकास लखेडा यांनी आसाम रायफल्सचे महासंचालक म्हणून पदभार स्वीकारला.

  • भारतीय लष्कराचे लेफ्टनंट जनरल विकास लखेडा हे आसाम रायफल्सचे नवे महासंचालक बनले आहेत.
  • शिलाँग येथील आसाम रायफल्सच्या मुख्यालयात त्यांनी पदभार स्वीकारला. तत्पूर्वी, आसाम रायफल्सच्या तुकडीने त्यांना गार्ड ऑफ ऑनर दिला.
  • जनरल टी.पी.एस. रावत यांच्यानंतर आसाम रायफल्सचे नेतृत्व करणारे ते दुसरे उत्तराखंडी आहेत.

5) धीरज सिंग यांनी पुणे येथील FTII च्या संचालक पदाचा स्वीकारला कार्यभार.

  • एक कुशल लेखक म्हणून त्यांनी लिहिलेले ‘मॉडर्न मास्टर्स ऑफ सिनेमा ‘ हे पुस्तक चित्रपट सृष्टीतील प्रभावशाली व्यक्तींवर प्रकाश टाकणारे आहे.
  • 1960 मध्ये स्थापन झालेली आणि सुरुवातीच्या काळात ‘फिल्म इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’ या नावाने ओळखली जाणारी, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (FTII) ही चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रातील शिक्षणासाठी समर्पित असलेली अग्रगण्य संस्था आहे.

6) देउड कातळशिल्प आता सरंक्षित स्मारक

  • कोकणातील अनेक भागात कातळशिल्प मोठ्या प्रमाणात आढळतात. अश्मयुगीन काळातील ही काताळशिल्प म्हणजे जणू गुढच आहे.
  • इतिहासपूर्व काळातील मानवी संस्कृतीच्या या पाउलखुणा आहेत.
  • कोकणातील कातळशिल्प ही संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यात आता आणखी एका कातळशिल्पाची भर पडली आहे.
  • राज्य सरकारने रत्नागिरी जिल्ह्यातील देउड कातळशिल्प संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे.

Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

TelegramWhatsAppCopy LinkShare

Leave a Comment