Current Affairs | चालू घडामोडी | 30 MAR 2024

Current Affairs | चालू घडामोडी | 30 MAR 2024

1) राजस्थान स्थापना दिवस = 30 मार्च 1949

  • क्षेत्रफळानुसार भारतातील सर्वात मोठे राज्य

2) फ्रान्सच्या मिशेल टालाग्रांड यांना 2024 साठीचा आबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला!

  • गणिताच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला नॉर्वेच्या राजाद्वारा दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो.
  • प्रदान:- शिक्षण मंत्रालयाच्या वतीने नॉर्वेजियन अकादमी ऑफ सायन्स अँड लेटर्सद्वारे हा पुरस्कार दिला जातो.
  • नॉर्वेजियन गणितज्ञ ‘नील्स हेन्रिक अबेल’ यांचे नाव या पुरस्काराला देण्यात आले आहे.
    • सुरुवात :- 2003
    • स्वरूप :- 7.5 दशलक्ष नॉर्वेजियन क्रोनर (सुमारे 6.55 कोटी रुपये.)
    • या पुरस्काराचे प्रथम मानकरी :- जीन पियरे सेरे (फ्रान्स)
    • आत्तापर्यंतचे भारतीय विजेते :- एस. आर. श्रीनिवास वर्धन-2007 (भारतीय अमेरिकन नागरिक)
  • हा पुरस्कार गणितातील नोबेल पुरस्कार म्हणून ओळखला जातो.

3) सौदी अरब हा देश इतिहासात पहिल्यांदाच विश्वसुंदरी स्पर्धा अर्थात मिस यूनिव्हर्स स्पर्धेत सहभागी होणार आहे.

  • देशाचे प्रतिनिधित्व :- रुमी अलकाहतानी

4) विराट कोहली ठरला T20 मधील भारताचा पहिला 12 हजार धावा करणारा फलंदाज

  • T20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा
  1. क्रिस गेल = 14,562 धावा
  2. शोएब मलिक
  3. कायरन पोलार्ड
  4. ॲलेक्स हेल्स
  5. डेव्हिड वॉर्नर

5) पोलीस क्षेत्रातील नवीन नियुक्त्या

  1. पोलीस संशोधन व विकास ब्युरो महासंचालक (BPRD) = राजीव कुमार यांची नियुक्ती
  2. राष्ट्रीय आपत्ती निवारण दल (NDRF) प्रमुख = पियुष आनंद यांची नियुक्ती
  3. राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) = सदानंद दाते यांची नियुक्ती

6) निवडणुकीचा इतिहास – 11

  • 1996 ते 1998 पर्यंत देशाचे तीन पंतप्रधान झाले
  • सर्वप्रथम अटल बिहारी वाजपेयी 1996 साली तेरा दिवसांचे पंतप्रधान बनले
  • त्यानंतर काँग्रेसच्या पाठिंब्यावर एचडी देवेगौडा व इंद्रकुमार गुजराल यांचे अल्पकालीन सरकारे अस्तित्वात आले
  • काँग्रेसने गुजरात यांच्या सरकारचा पाठिंबा काढल्यानंतर 1998 ला मध्यवर्ती निवडणूक लागली. या निवडणुकीनंतर ही कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही.
  • भाजपचे अटल बिहारी वाजपेयी तेलगू देसम व अण्णा द्रमुकच्या पाठिंब्याने दुसऱ्यांदा राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे पंतप्रधान बनले. मात्र हे सरकारही 13 महिन्यांत पडले.
  • काँग्रेसने वाजपेयी सरकार विरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता. हा ठराव वाजपेयी सरकार केवळ एका मतांनी हरले.
  • 12 व 13 मे 1998 ला राजस्थानतील पोखरण मध्ये वाजपेयी सरकारने अणुचाचणी केली होती.
  • त्यानंतर 1999 साली झालेल्या निवडणुकीत वाजपेयी सरकारने “जय जवान, जय किसान, जय विज्ञान” असा नारा दिला.
  • 1999 मध्ये वाजपेयी सरकार पुन्हा निवडून आले व या सरकारने मात्र आपला कार्यकाळ पूर्ण केला

7) महाराष्ट्राची मानचिन्हे

राज्य मासा :- सिल्व्हर पॉपलेट (पॉम्फ्रेट)
राज्य फूल :- जारूळ (ताम्हण)
राज्य वृक्ष :- आंबा
राज्य प्राणी :- शेकरू
राज्य कांदळवन वृक्ष :- पांढरी चिप्पी (सफेर चिप्पी)
राज्य पक्षी :- हरोली (हरियाला)
राज्य फुलपाखरू :- राणी पाकोळी, नीलपरी (ब्ल्यू मॉरमॉन)
राज्य खेळ :- कबड्डी
राज्य गीत :- जय जय महाराष्ट्र माझा


Join our Telegram and WhatsApp channels dedicated to studying and preparing for the MPSC, UPSC and Banking exams. Stay ahead in your exam journey with valuable insights, expert tips and comprehensive study materials. Let’s achieve success together!
MPSC, UPSC आणि Banking परीक्षांचा अभ्यास आणि तयारी करण्यासाठी आमच्या समर्पित Telegram आणि WhatsApp चॅनेलमध्ये सामील व्हा. मौल्यवान अंतर्दृष्टी, तज्ञांच्या टिप्स आणि सर्वसमावेशक अभ्यास सामग्रीसह तुमच्या परीक्षेच्या प्रवासात पुढे रहा. चला एकत्र यश मिळवूया!
Telegram Channel || WhatsApp Channel

Leave a Comment